Set 1: माझा भारत महान निबंध मराठी – Maza Bharat Mahan Nibandh Marathi
मी भारतीय आहे, याचा मला अभिमान आहे. माझा भारत हा प्राचीन देश आहे. त्याचा इतिहास वैभवशाली आहे. प्राचीन काळात भारत समृद्ध व ज्ञानात अग्रेसर होता.
भारतात भौगोलिक विविधता आहे. भारताच्या तीन बाजूंनी सागर व उत्तरेला उत्तुंग हिमालयाची सीमा आहे. भारतातील हवामान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असल्याने धान्ये, फळे, भाज्या, फुले यांच्यातही विविधता आढळते.
भारत हा जसा वीरांचा, शूरांचा देश आहे, तसाच तो संतांचाही देश आहे. भारतात विविध धर्माचे लोक राहतात व ते भिन्न भाषा बोलतात. या सर्व भाषांतील साहित्य समृद्ध आहे.
भारताने दीडशे वर्षे गुलामगिरी साहिली. तेव्हा एकजूट करून भारतीयांनी लढा दिला व १९४७ साली स्वातंत्र्य मिळवले. स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षांत भारताने विविध क्षेत्रांत विकास साधला. या विशाल देशाला अनेक नैसर्गिक आपत्तींना व मानवनिर्मित संकटांना वेळोवेळी तोंड दयावे लागले आहे. पण सर्व भारतीय संघटित होऊन मोठ्या जिद्दीने त्यांवर मात करतात.
मनुष्यबळ ही भारताची मोठी शक्ती आहे. त्यामुळे भारत विविध क्षेत्रांत सतत प्रगती साधत आहे. आज अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वावलंबी आहे. औदयोगिक, वैज्ञानिक क्षेत्रांत जगात अग्रेसर बनला आहे. माझा भारत खरोखर महान आहे.
Set 2: माझा भारत महान निबंध मराठी – Maza Bharat Mahan Nibandh Marathi
भारत माझा देश आहे. त्यास हिंदूस्थान असेही म्हटले जाते. भारत आशिया खंडात आहे. याच्या उतरेला हिमालय पर्वत, दक्षिणेला, हिंदी महासागर, पश्चिमेला अरबी समुद्र तर पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. पाकिस्तान, बांगला देश, चीन हे शेजारी राष्ट्र आहेत. येथील ७० % लोक खेड्यांत राहतात.
व चीननंतर भारत सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश आहे. बहुसंख्य हिंदू असणारे राष्ट्र असूनही इथे सर्वधर्मसमभाव आहे. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन सगळेच आपापसांत प्रेमाने राहतात. सर्वांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. इथे अनेक जाती व अनेक भाषा बोलल्या जातात. परंतु राष्ट्रभाषा मात्र हिंदी आहे. अनेक प्रकारचे रीतिरिवाज, वेशभूषा येथे दिसते. राजा हरिश्चंद्र, शिबी राजा, रामासारख्या सत्यवचनी राजांनी या धरतीला पवित्र केले. चाणक्यासारखा मुत्सद्दी आणि विदुरासारखे नीतिमान पण या भारतात होऊन गेले.
भारतात गंगा, यमुना, सरस्वतीसारख्या नद्या, हिमालय पर्वत, जगातील सात आश्चर्यापैकी एक ताज महाल, लाल किल्ला, अजिंठा वेरुळच्या लेण्या, कुतुबमिनार ही देशातील वास्तुकलेची उत्कृष्ट उदाहरणे होत. जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे गाव चेरापुंजी भारतातलेच. निसर्ग सौंदर्याचा अतिसुंदर आविष्कार काश्मीर, सिमला, मसुरी, माऊंट अबू या सारख्या थंड हवेच्या ठिकाणी पाहावयास मिळतो. विदेशी पर्यटकांना ही सर्व ठिकाणे आकर्षित करतात.
येथे लोखंड, कोळसा, तांबे, नैसर्गिक वायू, युरेनियम इत्यादी खनिजे विपुल प्रमाणावर सापडतात. आज भारत औद्योगिक क्षेत्रातही प्रगतीच्या मार्गावर आहे. टी.व्ही. रेडिओ. मोटारी, बस, ट्रक, रेल्वे, जहाजे, दारुगोळा, क्षेपणास्त्र निर्मितीत भारत स्वयंपूर्ण झाला आहे.
भारत हा जगातील सर्वात प्रमुख लोकशाही देश आहे. भारताला आज आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. सर्वांगीण प्रगती झाल्यामुळे भारत आज आशिया खंडातील एक महत्त्वाचा देश बनला आहे.
पुढे वाचा:
- माझा भाऊ निबंध मराठी
- माझा छंद बागकाम निबंध मराठी
- माझा गाजलेला छंद निबंध मराठी
- माझा आवडता सण निबंध मराठी
- माझा आवडता सण विजया दशमी निबंध
- माझा आवडता सण गुढीपाडवा निबंध
- माझा आवडता सण गणेश चतुर्थी निबंध मराठी
- माझा आवडता विषय मराठी निबंध
- माझा आवडता विषय इतिहास
- माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध
- माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध
- माझा आवडता पक्षी कोकिळा निबंध मराठी
- माझा आवडता पक्षी मोर निबंध मराठी