घायाळ सैनिकाचे आत्मवृत्त – Ghayal Sainik Ki Atmakatha Nibandh in Marathi

शनिवारी लवकर शाळा सुटली आणि मित्रासोबत घरी निघालो तर वाटेतील गुलमोहराच्या झाडाखाली एक केळीवाला दिसला. पण आश्चर्य वाटले. त्याला एकच पाय होता आणि काखेत अडकवलेली काठी. राहवले नाही म्हणून सहज विचारले, ‘काका, तुमचा एकच पाय…

अचानक त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या आणि म्हणाले, ‘बाळ, मी एका गरीब गरीब कुटुबांतला. पण गरीबीमुळे शिक्षण फारसे घेऊ शकलो नाही आणि पोटापाण्यासाठी, देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात भरती झालो. मेरठ येथे मंगल पांडेची आठवण झाली आणि शरीरात नवे वारे संचारले.’

१९७१ साली पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. मी माझ्या तुकडीबरोबर शत्रूवर तुटून पडलो. दहा बारा दुश्मनांना ठार केले आणि तेवढ्यात एक गोळी माझ्या मांडीत घुसली. मला चक्कर येऊन मी खाली पडलो. जेव्हा डोळे उघडले तेव्हा रुग्णालयात पडलो होतो.

माझा एक पाय पूर्ण कापून शरीरापासून वेगळा केला होता. वाईट वाटले. पण पुन्हा देशसेवा करता येणार नाही म्हणून दुःख वाटू लागले. आणि आता मी हा असा आहे…

ते ऐकून माझ्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

पुढे वाचा:

Leave a Reply