भारतातील वैज्ञानिक प्रगती निबंध मराठी
एके काळी भारत दैववादी होता, अनेक अंधश्रद्धांनी येथील लोकांची मने ग्रासून टाकली होती. अज्ञानामुळे तसे घडत होते. आपण तेव्हा पारतंत्र्यात होतो, त्यामुळे आपण अज्ञानी असणे हे आपल्यावर राज्य करणा-या इंग्रजांच्या फायद्याचे होते. परंतु आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि आपल्या देशाने वैज्ञानिक प्रगतीची मुहूर्तमेढ रोवली. आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी आय. आय. टी.सारख्या वैज्ञानिक संस्था काढल्या. बंगलोर, मुंबई येथील वैज्ञानिक केंद्रांना भरपूर सहाय्य केले, भाभा अणुसंशोधन केंद्र काढले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अशा त-हेने आपण हळूहळू वैज्ञानिक प्रगती करू लागलो.
एके काळी म्हणजे १९७२ सालापूर्वी आपल्या देशात दोनतीन वेळा सलग दुष्काळ पडला होता, त्या काळात उपासमारीने माणसे मृत्युमुखी पडली होती, तसेच आपल्याला अमेरिकेहून मिलोसारखा निकृष्ट गहू खरेदी करावा लागला होता. परंतु आपण विज्ञानाची कास धरली आणि हरित क्रांती केली.आपली संस्कृती ही मूलतः कृषी संस्कृती असल्यामुळे शेती करण्याच्या नव्या पद्धती, उत्कृष्ट बी-बियाणे, रासायनिक खते, धरणे आणि कालव्यांतून आणलेले पाणी इत्यादींचा वापर करून दर एकरी धान्योत्पादन वाढवले. त्यामुळे आपला देश अन्नाच्या बाबतीत आज स्वयंपूर्ण आहे आणि ही सर्व विज्ञानाचीच तर कमाल आहे.
आज जहाज बांधणी, रॉकेट्स, उपग्रह इत्यादींच्या निर्मितीत भारत अग्रेसर आहे. भारतीय सैन्याला लागणा-या नव्या प्रकारच्या तोफा, बंदुका, रडारयंत्रे, विमाने आदी बरेचसे साहित्य आता आपण भारतातच बनवतो. क्षेपणास्त्रांच्या बाबतीतही भारत पुढारलेला आहे. उर्जेच्या क्षेत्रात आपली प्रगती कौतुकास्पद आहे. नद्यांचे पाणी अडवून त्याचा उपयोग सिंचन आणि वीजनिर्मितीसाठी करण्यात येतो. सौर उर्जा, पवनचक्की, औष्णिक विद्युत आणि अणूविद्युत इत्यादी बाबी उर्जेच्या क्षेत्रातील आपली प्रगती दर्शवितात. आपण अणुशक्तीचा उपयोग विधायक कामासाठीच करतो. मात्र आपला शेजारी चीन ह्याच्यापाशी अणूबॉम्ब असल्यामुळे स्वतःची सरंक्षणक्षमता वाढवण्यासाठी १९७४ साली आपण अणुबॉम्ब तयार केला. त्याशिवाय हल्लीच ‘इस्त्रो’ ह्या भारतातील अंतराळ संशोधन संस्थेने मंगळावर मानवरहित यान पाठवले आहे. कृत्रिम उपग्रहांच्या बाबतीत आपण अनेक पाश्चिमात्य देशांशी स्पर्धा करीत आहोत. भास्कर, ऍपल, इन्सॅट,रोहिणी असे बरेच उपग्रह आपण यशस्वीपणे आकाशात सोडले त्यामुळे आपली दूरसंचारव्यवस्था अत्यंत सुदृढ झाली. हे सर्व विज्ञानाच्या प्रगतीनेच तर साध्य झाले.
आपण महानगरांमध्ये बहुमजली इमारती बांधू शकतो, रस्ते, उड्डाणपूल, भूमिगत रस्ते, मेट्रो ह्या सर्व आपल्या वैज्ञानिक प्रगतीच्या खुणा आहेत. म्हणूनच मला वाटते की भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात चांगली झेप घेतली आहे ह्यात काहीच संशय नाही.
पुढे वाचा:
- भारतातील वनसंपदा निबंध मराठी
- भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर निबंध मराठी
- डॉ विक्रम साराभाई निबंध मराठी
- भारत माझा जगी महान मराठी निबंध
- विविधतेत एकता निबंध मराठी
- भाज्या आणि फळांचे महत्व निबंध मराठी
- भाऊबीज निबंध मराठी
- भटक्या जमातीतील तरुणाची कैफियत
- भगवान गौतम बुद्ध निबंध मराठी
- बैल प्राणी निबंध मराठी
- बालमजुरी निबंध मराठी
- माझे बालपण निबंध मराठी
- बालदिन निबंध मराठी
- बाबा आमटे निबंध मराठी
- आचार्य भावे मराठी निबंध
- बाजारातील एक तास निबंध मराठी
- बाग निबंध मराठी